रुग्ण वाढले, पण हॉस्पिटलायझेशन कमी – प्रशासन सतर्क

नवी दिल्ली – देशात कोविड-१९ संसर्गाचे प्रमाण पुन्हा वाढत असल्याचे
संकेत मिळत असून, गेल्या २४ तासांत
६५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण सक्रिय रुग्णसंख्या ४,०२६ वर पोहोचली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली
आहे.
गेल्या २४ तासांत पाच जणांचा मृत्यू
झाला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील दोन, तर केरळ, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशातील प्रत्येकी एक रुग्ण आहे. सर्व मृत्यू
झालेल्या रुग्णांना पूर्वीपासून आरोग्यसंबंधित गंभीर समस्या होत्या.
राज्यनिहाय रुग्णसंख्या:
- केरळ – सर्वाधिक
१,४३५ सक्रिय रुग्ण
- महाराष्ट्र – ४९४
सक्रिय रुग्ण
- इतर
राज्ये
– नियंत्रणात
आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जरी रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे. NB.1.8.1 सब-व्हेरिएंट : सौम्य लक्षणे देशात आढळणारे नवीन रुग्ण NB.1.8.1 या कोरोना सब-व्हेरिएंटशी संबंधित असल्याचे ICMRने स्पष्ट केले आहे. हा व्हेरिएंट जरी जलद पसरत असला, तरी त्याची लक्षणे सौम्य स्वरुपाची आहेत.
लक्षणे:
- सौम्य
ताप
- खोकला
- घसा
खवखवणे
- थकवा, डोकेदुखी
- शरीरदुखी, फ्ल्यू
- भूक
मंदावणे
प्रशासनाची प्रतिक्रिया
आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांना
घाबरून न जाण्याचे आवाहन करत, केंद्र व राज्य
सरकारने आवश्यक ती खबरदारी घेण्यास सुरुवात केल्याचे सांगितले आहे. तसेच, नागरिकांनी स्वच्छता राखणे, मास्क वापरणे व लसीकरण
पूर्ण करणे या गोष्टींकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.