अरण्यऋषी निवर्तले: पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचे निधन
.jpeg)
सोलापूर: निसर्गप्रेमी विचारवंत,
'पद्मश्री' अरण्यऋषी मारुती भुजंगराव
चित्तमपल्ली यांचे बुधवार 18 जून
रोजी सायंकाळी ७.५० वा. वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांचे वास्तव्य अक्कलकोट रोडवरील सूत मिल हेरिटेज, मनिधारी
एम्पायर सोसायटी येथे होते. त्यांची अंत्ययात्रा गुरुवार १९ जून रोजी दुपारी १
वाजता राहत्या घरापासून निघणार असून, रूपा भवानी मंदिराजवळील
हिंदू स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात भावजय, दोन पुतणे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.अलीकडेच
त्यांनी 'पद्मश्री' पुरस्कार
स्वीकारण्यासाठी दिल्लीला प्रवास केला होता. त्या प्रवासातील थकव्याने त्यांची
प्रकृती ढासळत गेली. गेल्या दहा दिवसांपासून त्यांनी अन्नत्याग केला होता व केवळ
दूध व थोडेसे पाणी घेत होते. अरण्य ऋषी नावाने परिचित असलेले चितमपल्ली
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षही होते.
(सविस्तर वृत्त
लवकरच)