सर्वोच्च न्यायालयात याचिका : भारत-पाकिस्तान टी-२० सामना रद्द करण्याची मागणी

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आगामी क्रिकेट सामन्याबाबत
सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. १४ सप्टेंबर रोजी दुबईत
होणारा टी-२० सामना रद्द करण्याची मागणी कायद्याच्या विद्यार्थ्यांनी उर्वशी
जैन यांच्या नेतृत्वाखाली केली आहे.
याचिकेची कारणमीमांसा
- पहलगाम दहशतवादी
हल्ला आणि 'ऑपरेशन
सिंदूर' नंतर पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणे हे राष्ट्रीय
प्रतिष्ठा आणि जनभावनांच्या विरुद्ध असल्याचे मत.
- “क्रिकेटला
राष्ट्रीय हित, सैनिकांचे बलिदान किंवा नागरिकांच्या
सुरक्षेपेक्षा अधिक महत्त्व देता येणार नाही.”
- राष्ट्रीय क्रीडा
प्रशासन कायदा २०२५ च्या अंमलबजावणीसाठीही निर्देश मागितले.
याचिका कोणाकडून दाखल?
- वकील स्नेहा राणी, अभिषेक वर्मा आणि मोहम्मद अनस
चौधरी यांच्या मार्फत
सर्वोच्च न्यायालयात दाखल.
- सर्वोच्च
न्यायालयाला सामन्यावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती.
सामन्यावर अनिश्चितता
- भारत-पाक सामना
आशिया चषकातील एक महत्त्वाचा टप्पा.
- याचिकेतील राष्ट्रीय
सुरक्षेच्या मुद्द्यांमुळे सामना होईल की नाही यावर शंका.
- सुनावणी सामन्याच्या
तारखेपूर्वी होण्याची शक्यता.
आशिया चषक २०२५: भारताची दमदार सुरूवात
- भारताने पहिल्या
सामन्यात युएईचा ९ विकेट्सने पराभव केला.
- कुलदीप यादव – ७
धावांत ४ बळी.
- शिवम दुबे – ४ बळी.
- युएई ५७ धावांत
सर्वबाद (१३.१ षटके).
- भारताने लक्ष्य ४.३
षटकांत सहज गाठले.
- अभिषेक शर्मा (३०), शुभमन गिल (२०*), सूर्यकुमार यादव (७*).