महाराष्ट्रात 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट – मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : — महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या
मुसळधार पावसानंतर 30 जुलैला राज्यातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विशेषतः कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील
जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे या दोन जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये घाटमाथ्यावर मुसळधार, तर अन्य भागांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात
विजांसह पाऊस छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, परभणी, जालना, लातूर, धाराशिव आणि हिंगोली या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्यापावसाचा अंदाज आहे. याठिकाणी सध्या कोणताही सतर्कतेचा इशारा नाही. उत्तर महाराष्ट्रात — नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये देखील मध्यम पावसाचा अंदाज आहे, मात्र कोणताही अलर्ट जाहीर केलेला
नाही. विदर्भात यलो अलर्ट अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा — या ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाचे आवाहन हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले
आहे. यलो अलर्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये शालेय प्रशासन, आपत्कालीन यंत्रणा आणि शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज
पाहून खत, औषध फवारणी आणि पेरणी यांसारखी कामे
नियोजित करावीत.