"सिंदूर ऑपरेशननंतर मोदी गप्प का?" – काँग्रेसचा सवाल

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम
येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर कारवाई केली
असली तरी, या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोदी सरकारवर कडाडून
टीका केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मीडिया विभागप्रमुख पवन खेरा
यांनी भाजपा सरकारवर राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर 'स्वस्त
राजकारण' करण्याचा आरोप केला आहे. “आम्ही
प्रश्न विचारत राहू” पवन खेरा म्हणाले, "त्यांना
वाटते की विरोधक गप्प बसतील आणि देशाच्या सुरक्षेशी संबंधित प्रश्न विचारणार
नाहीत. पण तसे होणार नाही. जर आम्ही प्रश्न विचारले नाहीत तर देशात अशा घटना घडत
राहतील," असा इशारा त्यांनी दिला. “जयशंकर यांचं विधान म्हणजे पाप” पुढे बोलताना त्यांनी परराष्ट्र मंत्री
एस. जयशंकर यांच्या विधानाचा संदर्भ देत, "ते जे करत
आहेत, ते एक प्रकारचं पाप आहे. हे केवळ आजच नाही, तर अनेक वर्षांपासून सुरू आहे," असेही ते
म्हणाले. मोरारजी देसाईंवरही गंभीर आरोप
इतिहासातील उदाहरण देत खेरा म्हणाले, "मोरारजी देसाईंना जनसंघ आणि जनता पक्षाने पंतप्रधान बनवले होते. त्यावेळी
त्यांनी पाकिस्तानचे सैन्यप्रमुख झिया-उल-हक यांना फोन करून रॉ एजंट्सबाबतची
गोपनीय माहिती सांगितली होती. कहूता येथील अणुप्रकल्पासंदर्भात भारताकडे असलेली
माहिती त्यांनी पाकिस्तानला दिली होती." त्यांनी
दावा केला की, "या घटनेची नोंद इतिहासात आहे,
आणि हे व्हॉट्सअॅपवर फिरणारे मेसेज नाहीत."