राजस्थान-पाक सीमा भागात युद्धजन्य तयारीचं वातावरण

जयपूर – पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर भारतीय हवाई दलाने केलेल्या ऑपरेशन सिंदूर’ नंतर राजस्थानच्या सीमावर्ती भागात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. जैसलमेर, बारमेर आणि जोधपूरमधील सीमा सील करण्यात आल्या असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. शाळांना सुट्टी आणि परीक्षा पुढे ढकलल्या
बारमेरच्या जिल्हाधिकारी टीना दाबी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव सर्व शासकीय आणि खाजगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आज (बुधवार) घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विमानसेवांवरही परिणाम जयपूर ते चंदीगड आणि मस्कतला जाणारी ओमान एअरची तिन्ही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. आतापर्यंत चार विमाने जयपूर विमानतळावर वळवण्यात आली आहेत. बिकानेर आणि जोधपूर विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. सैन्य हालचालींनी खळबळ जैसलमेर आणि बारमेर भागात रात्रीपासून लढाऊ विमानांचा आवाज सतत ऐकू येत असून स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना रजा घेण्यास बंदी घालण्यात आली असून आपत्कालीन यंत्रणा सतर्क आहेत. बहावलपूरमध्ये एअर स्ट्राईक ऑपरेशन सिंदूरमध्ये लक्ष्य करण्यात आलेल्या नऊ दहशतवादी ठिकाणांपैकी एक बहावलपूर हे ठिकाण राजस्थानच्या सीमेपासून अवघ्या १०० किमी अंतरावर आहे. जैश-ए-मोहम्मदचे तळ येथे उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती आहे.