उत्तराखंड हादरले! पुलकित, सौरभ, अंकित दोषी ठरले

कोटद्वार / उत्तराखंड : २०२२ मध्ये उत्तराखंडमध्ये घडलेल्या अंकिता भंडारी हत्या प्रकरणात कोटद्वार येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने तीनही आरोपी – पुलकित आर्य, सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता यांना दोषी ठरवले आहे. आरोपींना भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (खून), ३५४ (महिलेला असभ्य वर्तनाने त्रास देणे), आणि १२० बी (षड्यंत्र) अंतर्गत दोषी घोषित करण्यात आले आहे. ३० मे रोजी शिक्षा होणार जाहीर या निकालानंतर ३० मे रोजी न्यायालय शिक्षेची घोषणा करणार आहे. या खटल्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून, उत्तराखंडमध्ये जनतेमध्ये संतप्त भावना आहे.

काय आहे अंकिता भंडारी हत्या प्रकरण?

सप्टेंबर २०२२ रोजी, पौडी जिल्ह्यातील वनयंत्र रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या १९ वर्षीय अंकिता भंडारीची हत्या करण्यात आली होती. तिचा मृतदेह एका आठवड्यानंतर चिला येथील शक्ती कालव्यात सापडला होता. आरोपींनी तिला वेश्याव्यवसायासाठी जबरदस्तीने ग्राहकांसमोर ढकलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही याआधी झाला होता.

कोटद्वारमध्ये मोठी सुरक्षा व्यवस्था

न्यायालयाचा निकाल जाहीर होणार असल्याने, कोटद्वारमध्ये सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. गढवाल विभागातील विविध जिल्ह्यांमधून पोलिस दल तैनात करण्यात आले असून, रस्त्यांवर बॅरिकेड्स लावून वाहतुकीचा अडथळा रोखण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. सुनावणी १९ मे रोजी पूर्ण, आता शिक्षेची वाट १९ मे रोजी विशेष सरकारी वकील अवनीश नेगी यांनी अंतिम युक्तिवाद पूर्ण केला. त्यानंतर न्यायालयाने ३० मे ही तारीख निकालासाठी निश्चित केली होती. आता संपूर्ण देश अंकिताला न्याय मिळणार का याकडे लक्ष ठेवून आहे.