उजनी धरण ७०% भरले, १६ दरवाजे खुले

सोलापूर : पुणे परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्याच्या
जीवनदायिनी उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या धरण ७०%
क्षमतेने भरले असून, पाणीपातळीत वाढ होत असल्याने प्रशासनाने
१६ दरवाजे उघडले आहेत. भीमा नदीच्या पात्रात १६०० क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात
आला आहे. गेल्या ३६ दिवसांत ४८.८० टीएमसी पाण्याची आवक धरणाच्या पाणलोट क्षेत्रात
गेल्या ३६ दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ४८.८० टीएमसी इतक्या
पाण्याची धरणात भर घातली गेली आहे. दौंडमार्गे धरणात ६७ हजार क्युसेक्स पाण्याचा
विसर्ग सुरू आहे. ही मोठी पाणीवाढ पाहता, धरणाची पातळी
नियंत्रित ठेवणे हे प्रशासनासाठी मोठं आव्हान बनलं आहे. १० जुलैपर्यंत ७०% वरच
ठेवणार पातळी पाटबंधारे विभाग आणि जिल्हा प्रशासनाने धरणातील पाणीपातळी १०
जुलैपर्यंत ७०% वर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. संभाव्य पूरस्थितीचा विचार
करून, भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला
आहे. नागरिकांना प्रशासनाचे आवाहन प्रशासनाने नागरिकांना नदीपात्रात जाणे
टाळण्याचे, गुरेढोरे सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आणि प्रशासनाच्या
सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. नदीकिनाऱ्यावरील गावांनी कोणतीही खबरदारी
न घेता पाण्याच्या प्रवाहाकडे दुर्लक्ष केल्यास अनर्थ ओढवू शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.