हे लोक संविधान बदलायलाही तयार होते

नवी दिल्ली, दि. १३-
...तर हे लोक संविधान बदलायलाही तयार होते, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. वायनाडमधून खासदार म्हणून निवडून
आल्यानंतर लोकसभेतील चेयावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवरही मात्र, जनतेत जाण्याची आणि टीका ऐकण्याची हिंमत नाही, असे
प्रियंका म्हणाल्या. बीन हे त्यांचे पहिलेच भाषण होते. २५ थेट टीका केली. आजच्या
राजाला बता वेश बदलणे तर माहीत आहे.
आम्ही संविधानाची ज्योत जळताना बघितली आहे आणि हे एक सुरक्षा कवच असल्याचेही समजले आहे. एक असे सुरक्षा कवच, जे देशातील नागरिकांना सुरक्षित ठेवते. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कवच आहे. मात्र, दुःखाची गोष्ट म्हणजे, आपले सत्ताधारी पक्षातील सहकारी, जे मोठ मोठ्या गप्पा मारतात, त्यांनी गेल्या १० वर्षांत हे सुरक्षा कवच तोडण्याचा पूर्ण प्रयत्न केला. खरे तर, हे वारंवार संविधान संविधान करत आहेत, कारण यांना, देशातील जनता संविधान बदलू देणार नाही, हे माहीत झाले आहे. यांना पराभूत होता होता हे लक्षात आले आहे. मोदींकडे टीका ऐकण्याची हिंमत नाही
पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना प्रियंका म्हणाल्या, पंतप्रधान संविधान कपाळावर लावतात, पण जेव्हा
न्यायासाठी आवाज येतो, तेव्हा त्यांच्या कपाळावर सुरकुतीही
नसते. भारतीय राज्यघटना हे संघाचे विधान नाही. हे त्यांना समजलेले नाही. करोडो
देशवासियांच्या हृदयात एकमेकांबद्दल प्रेम आहे, द्वेष नाही.
यांच्या फुटीरतावादी
धोरणांचे परिणाम आपण रोज पाहतो. राजकीय फायद्यासाठी
संविधान तर सोडाच, पण देशाची एकात्मताही पणाला लावतील.
सत्ताधारी पक्ष ७५ वर्षांसंदर्भात बोलतात. पण या वर्षांत राज्यघटनेची ज्योत कधीही
मंदावली नाही. जनतेने निर्भयपणे निदर्शने केली. ती संतप्त झाल्यावर तिने सरकारला
आव्हान दिले. बड्या नेत्यांवरही आरोप केले. पण आज हे वातावरण नाही. आज जनतेला सत्य
बोलण्यापासून रोखले जाते. पत्रकार असो की विरोधी पक्षनेते, सर्वांची
तोंडे बंद केली जातात. असे भीतीचे वातावरण ब्रिटिश सरकारच्या काळात होते. एवढेच
नाही, तर आजचे राजे वेश तर बदलतात, पण
ना जनतेत जातात, ना टीका ऐकण्याची हिंमत आहे, असेही प्रियंका म्हणाल्या. संविधान भक्षक कधी रक्षक होऊ शकत नाहीत राजीव
रंजन यांचा हल्ला
संविधान दिनानिमित्त लोकसभेतील चर्चेदरम्यान मुंगेरचे
जेडीयू खासदार तथा केंद्रीय पंचायत राजमंत्री राजीव रंजन उर्फ लल्लनसिंह यांनी
काँग्रेस पक्षावर जबरदस्त हल्ला चढवला. सबका साथ, सबका विकास, सबका
विश्वास और सबका प्रयास' हाच आपल्या संविधानाचा मूल मंत्र
आहे. ही गोष्ट यांना (विरोधी पक्षांना) कुठे समजणार. लल्लनसिंह पुढे म्हणाले,
जे संविधानाचे भक्षक आहेत, ते आजकाल
संविधानाची कॉपी घेऊन, अशा पद्धतीने फिरत आहेत, जसे काही संविधानाचे केवढे रक्षक आहेत. राहुल गांधींचे नाव न घेता,
लल्लनसिंह म्हणाले, 'जे संविधानाचे भक्षक आहेत,
ते संविधानाचे रक्षक कधीही होऊ शकत नाहीत. आपल्याकडे एक म्हण आहे,
'सौ चूहे खाकर, बिल्ली चली हज को'.
लल्लनसिंह पुढे म्हणाले, यांनी आपल्या सोयीसाठी घटनेत कलम ३५६ ची तरतूद केली. भीमराव आंबेडकरांनी कलम ३५६च्या तरतुदीला राज्यघटनेचे मित्रपत्र म्हटले आहे. अर्थात ते केवळ विशेष परिस्थितीतच वापरले जायला हवे.