शैक्षणिक क्रांतीसाठी वीरशैव लिंगायत मठाधीशांचे योगदान महत्त्वपूर्ण – मंत्री शिवानंद पाटील

विजयपूर :- शैक्षणिक क्रांतीसाठी वीरशैव लिंगायत
मठाधीशांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे
मत मंत्री शिवानंद पाटील यांनी व्यक्त केले कोल्हार येथील हिरेमठामध्ये झालेल्या पट्टदेवर
कार्यक्रमातील 'सद्धर्म' समारंभात
जगरगुरूंनी त्यांचा सत्कार केल्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले, "राज्य सरकारांनीही जे करू शकले नाही, ती शैक्षणिक
क्रांती वीरशैव लिंगायत मठाधीशांनी घडवून आणली आहे. बीदरपासून चामराजनगरपर्यंत
अन्नदासोह आणि ज्ञानदासोहाच्या माध्यमातून त्यांनी कर्नाटकमध्ये शिक्षणक्रांती
घडवली आहे." विशेषतः, डॉ. शिवकुमार स्वामी (सिद्धगंगा
मठ) आणि विजयपूर जिल्ह्यातील बंथनाळ संगनबसव स्वामींचे योगदान हे अद्वितीय असून ते
सदा उच्च शिखरावर आहे, असेही त्यांनी सांगितले. पूर्वीचे
जुने कोल्हार गाव कृष्णा नदीच्या अलमट्टी धरणाच्या पाण्याखाली गेल्यानंतर नवे
कोल्हार वसवले गेले. या पुनर्वसन प्रक्रियेत वीरशैव पंचपीठांचे जगद्गुरू आणि
बसवशरणांचे आशीर्वाद लाभले. त्यामुळेच, आज एका मंचावर चार
जगद्गुरूंना निमंत्रित करण्यात आले आहेत आणि भविष्यात पंचपीठांचे पाचही जगद्गुरू
येथे एकत्र यावेत अशी ताकद कोल्हारच्या जनतेस लाभावी अशी प्रार्थना त्यांनी केली. बसवशरणांनी
दिलेला जात-धर्मरहित समतेचा संदेश आज अत्यंत आवश्यक आहे. श्रेष्ठ वचनकार
अक्कमहादेवी यांनी दिलेले तत्त्वज्ञान समाजात रुजवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. जाती, धर्म, वर्ग आणि राजकारणापासून मुक्त असा धार्मिक समारंभ कोल्हारमध्ये आयोजित
करण्यात आला असून तो अनुकरणीय ठरावा, अशी त्यांनी अपेक्षा
व्यक्त केली. उज्जयिनी पीठाचे डॉ. सिद्धलिंग राजदेशिकेंद्र शिवाचार्य, श्रीशैल पीठाचे डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य, वरिष्ठ काशी पीठाचे डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य, कनिष्ठ
काशी पीठाचे डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य, हिरेमठाचे
पट्टदेवर प्रभुकुमार शिवाचार्य, कोडेकळ विरक्त मठाचे
शिवकुमार स्वामी, मनगूळी हिरेमठाचे संगनबसव स्वामी, यरणाळ संगनबसव स्वामी, मसूतीचे प्रभुकुमार शिवाचार्य,
हिरेमठाचे पट्टदेवर मुरुघेंद्र स्वामी, तसेच
इतर अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन कविता अजय मुदकवी आणि
नवलिंग पाटील यांनी केले.
लिंगधारी प्रत्येकाला एकसमान पाहणारा कोणताही धर्म
असल्यास, तो म्हणजे वीरशैव धर्मच होय. रेणुक भगवंत
पाद यांनी जाती-पंथ न पाहता सर्वांना समान मानले, असे
जगद्गुरूंनी स्पष्ट केले.
बसवेश्वरांनीही “देह हेच देऊळ” असे वचनातून सांगितले आहे.
समतेचा हा संदेश आमच्या भूमीतील परंपरेतच आहे. कोल्हारच्या रजत महोत्सवाच्या
निमित्ताने संत-महंतांनी पावन केलेल्या या भूमीत हिरेमठाचे पट्टदेवर उदयास आले
आहेत. या शुभप्रसंगी पंचपीठांचे चारही जगद्गुरू तुमच्यासमोर उपस्थित राहून
तुम्हाला आशीर्वाद देत आहेत हे भाग्यच आहे असे सांगितले
मंत्री शिवानंद पाटील यांचा सत्कार उज्जयिनी पीठाचे
जगद्गुरू डॉ. सिद्धलिंग राजदेशिकेंद्र शिवाचार्य भगवंतपाद यांनी केला.