डायबिटीजच्या धोक्यामुळे शाळांमध्ये 'शुगर बोर्ड' सुरू
नवी दिल्ली : बदलत्या जीवनशैलीचा लहान मुलांच्या
आरोग्यावरही मोठा परिणाम होत असून, शाळकरी वयातच
डायबिटीजसारखे गंभीर आजार आढळू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने शाळांमध्ये
'शुगर बोर्ड' स्थापन करण्याचा ऐतिहासिक
निर्णय घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि रक्तातील
साखरेची पातळी नियमितपणे तपासली जाणार आहे. त्यामुळे वेळीच निदान होऊन, डायबिटीजचा धोका कमी करता येणार आहे. CBSE च्या
अधिकाऱ्यांनी सांगितले की, "शाळांमध्ये आरोग्य तपासणीला
प्राधान्य दिले जाणार असून, विद्यार्थ्यांना योग्य आहार,
शारीरिक व्यायाम आणि जीवनशैलीविषयी मार्गदर्शन दिले जाईल."
आरोग्य मंत्रालय आणि बालकल्याण विभागाच्या सहकार्याने, या उपक्रमाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने देशभरातील CBSE संलग्न शाळांमध्ये केली जाणार आहे. सुरुवातीला १००० शाळांमध्ये पायलट
प्रोजेक्ट म्हणून हा उपक्रम सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, हे
शुगर बोर्ड शिक्षक, आरोग्य तज्ज्ञ आणि पालक प्रतिनिधींनी
युक्त असणार असून, त्यांचा उद्देश विद्यार्थ्यांच्या
आरोग्यावर सातत्याने लक्ष ठेवणे हा असेल.