परीक्षेत नापास झाल्याने विद्यार्थ्यानीची आत्महत्या

विजयपूर:दहावीचा (SSLC) निकाल जाहीर झाल्यानंतर काही तासांतच चडचाण तालुक्यातील हालसंगी गावात एका १६ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मृत विद्यार्थिनीचे नाव भाग्यश्री राजेंद्र हुगर असे आहे. सर्व विषयांत अपयश, मनोबल खचले भाग्यश्री हिने यावर्षी SSLC परीक्षा दिली होती. ती निकालाची आतुरतेने वाट पाहत होती आणि उत्तीर्ण होण्याची आशा तिला होती. मात्र निकालात ती सर्व विषयांत नापास झाली, त्यामुळे ती मानसिक तणावात गेली. या नैराश्यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आईवडील घरी नसताना घेतला मृत्यूला कवेत झळकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दाखल झालेल्या गुन्ह्यांनुसार, दुपारी तिचे आईवडील घरी नसताना भाग्यश्रीने खोलीच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीयांनी घरी येऊन ही घटना पाहताच तिला तात्काळ रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.