जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन

पुणे : भारतीय विज्ञानजगतातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक जयंत नारळीकर यांचे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. झोपेतच त्यांनी पहाटे शेवटचा श्वास घेतला. ते ८६ वर्षांचे होते. जयंत नारळीकर यांचा जन्म १९ जुलै १९३८रोजी कोल्हापूर येथे झाला. वडील बनारस हिंदू विद्यापीठात शास्त्रज्ञ होते. नारळीकर यांचे शिक्षणही बनारस हिंदू विद्यापीठात झाले आणि पुढील शिक्षणासाठी त्यांनी केंब्रिज विद्यापीठ गाठले. तिथे त्यांनी बीए, एमए, पीएचडी, रँग्लर ही पदवी, टायसन मेडल आणि स्मिथ पुरस्कार मिळवले. ते खगोलशास्त्रज्ञ फ्रेड हॉईल यांचे शिष्य होते. त्यांनी ‘हॉईल-नारळीकर थिअरी’ मांडली, ज्यामध्ये बिग बँग थिअरीला पर्याय म्हणून जगाची निर्मिती वेगळी मांडली गेली. नारळीकर हे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) मध्ये कार्यरत होते आणि आयुका (IUCAA) या संस्थेच्या उभारणीतही त्यांचा मोलाचा वाटा होता. २०२१ मध्ये ते नाशिक येथे आयोजित अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांनी विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी अनेक मराठी विज्ञानकथा आणि विज्ञानविषयक पुस्तके लिहिली आहेत.
जयंत नारळीकर यांची प्रसिद्ध
पुस्तके –
विज्ञानकथा:
- अंतराळातील
भस्मासूर
- चला
जाऊ अवकाश सफरीला
- टाइम
मशीनची किमया
- याला
जीवन ऐसे नाव
विज्ञानविषयक:
- आकाशाशी
जडले नाते
- गणितातील
गमतीजमती
- नव्या
सहस्रकाचे नवे विज्ञान
- चार
नगरांतले माझे विश्व (आत्मचरित्र)
त्यांना मिळालेले प्रमुख पुरस्कार –
- २००४: पद्मविभूषण
- २०१०: महाराष्ट्र भूषण
- २०१४: साहित्य अकादमी
पुरस्कार
त्यांच्या जाण्याने भारतीय
विज्ञानजगतातील एक तेजस्वी तारा मावळला आहे. विज्ञानाचे समाजाशी नाते जोडणारे, सोप्या भाषेत अवकाशाचे गूढ उलगडणारे आणि विज्ञानाचे
लोकशाहीकरण करणारे नारळीकर यांचे योगदान अमूल्य ठरले.