राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा

राज्यात पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावण्याची
शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून, पुढील ३ ते ४ दिवस कोकण व
पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.
यामुळे दरड कोसळण्याचा आणि नद्यांची पाणीपातळी वाढण्याचा धोका संभवतो. मुंबई,
पुणे, कोल्हापूर, सातारा
आदी जिल्ह्यांमध्ये यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत. दुसरीकडे, विदर्भातील शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाअभावी खरीप
पेरण्या लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.