पहलगाम हल्ल्याचं निमित्त – केंद्र सरकारवर प्रणिती शिंदेंचा जोरदार प्रहार

सोलापूर |सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. "जसं राक्षसाला रक्त लागतं, तसं भाजपाला दंगली लागतात," असा घणाघात करत त्यांनी भाजपवर हिटलरशाही कारभाराचा आरोप केला. त्या सोलापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होत्या. जातनिहाय जनगणनेवर केंद्राला लेखी उत्तर द्या – शिंदे यांची मागणी

खासदार राहुल गांधी यांनी सातत्याने लावून धरलेला जातनिहाय जनगणनेचा मुद्दा अखेर केंद्राने मान्य केला असून, आता जातनिहाय जनगणना होणार असल्याची घोषणा केंद्राने केली आहे. मात्र, "कधीपर्यंत ही जनगणना करणार?" असा लेखी खुलासा केंद्राने करावा, अशी मागणी शिंदे यांनी केली. पहलगाम हल्ल्यावरून पंतप्रधानांवर टीका जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी म्हटलं की, "हल्ला होत असताना पंतप्रधान मोदी बिहारमध्ये प्रचारात मग्न होते," हा मुद्दा त्यांनी गंभीरतेने उपस्थित केला.

लाडकी बहिण योजनेवर टीका; सामाजिक न्याय विभाग नाराज शिंदे म्हणाल्या की, राज्यातील लाडकी बहिण योजना अडचणीत आली असून तिजोरी रिकामी आहे. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाचे ७०० कोटी रुपये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या योजनेसाठी वळवले. यामुळे विभागाचे मंत्री नाराज आहेत. PM किसान, महिला अत्याचार आणि रस्ते योजनांवरूनही केंद्रावर टीका PM किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत. RSS च्या मानसिकतेमुळे महिलांवर अत्याचार वाढलेत, असंही शिंदे यांनी स्पष्ट केलं. प्रधान मंत्री ग्राम सडक योजना बंद असून, राज्यातून दीड वर्षात एकही प्रस्ताव केंद्राकडे गेलेला नाही, असा आरोपही त्यांनी केला.