प्रवाशांचे प्राण वाचले! बालीच्या दिशेने निघालेलं विमान परत बोलावलं

नवी दिल्ली :- इंडोनेशियातील बालीजवळील माउंट लेवोटोबी लकी-लकी या ज्वालामुखीचा भीषण उद्रेक झाल्याने बुधवारी दिल्लीहून बालीकडे निघालेले एअर इंडियाचे AI2145 हे विमान परत बोलावण्यात आले. ज्वालामुखीमुळे निर्माण झालेल्या राखेच्या जाळ्यामुळे हवाई सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. विमान सुरक्षितपणे दिल्लीमध्ये उतरले असून, सर्व प्रवासी सुखरूप आहेत, अशी माहिती एअर इंडियाने दिली. प्रवाशांसाठी व्यवस्था आणि परतावा एअर इंडियाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रवाशांच्या निवासाची हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, प्रवाशांना पूर्ण परतावा किंवा मोफत पुढील प्रवासासाठी पुनर्नियोजनाचा पर्याय देण्यात आला आहे. माउंट लेवोटोबीचा धोकादायक उद्रेक मंगळवारी (१७ जून) झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकात ११ किमीपर्यंत राखेचे ढग हवेत फेकले गेले. इंडोनेशियन ज्वालामुखी निरीक्षण संस्थेने लेव्हल ४ (सर्वोच्च अलर्ट स्तर) जाहीर केला आहे. बुधवारी पुन्हा सकाळी १ किमी उंचीपर्यंत राख हवेत गेली आणि मऊमेरे विमानतळ बंद करण्यात आला. आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम या उद्रेकामुळे बालीकडे जाणारी आणि येणारी अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाली आहेत. भारत, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियातून येणाऱ्या फ्लाइट्सवर परिणाम झाला असून, बाली इंटरनॅशनल एअरपोर्टनेही याची पुष्टी केली आहे. स्थलांतराची वेळ ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर लावा आणि लाहर (धोकादायक चिखल प्रवाह) पसरू शकतो, म्हणून शेकडो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. Flores बेटावर असलेला हा 1584 मीटर उंचीचा ज्वालामुखी ‘Lewotobi Laki-Laki’ म्हणजे ‘पुरुष डोंगर’ म्हणून ओळखला जातो. याचा 1703 मीटर उंच ‘Perempuan’ (स्त्री) नावाचा जुळे शिखरही आहे . पूर्वीही घडली होती जीवघेणी घटना नोव्हेंबर २०२४ मध्येही या ज्वालामुखीने उद्रेक केला होता, ज्यात ९ जणांचा मृत्यू झाला होता आणि हजारो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते.