पालकांची संमती नसलेल्या विवाह प्रकरणात पोलिस संरक्षण घेता येणार नाही – अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय

Allahabad High Court Order: पालकांची संमती न घेता विवाह करणाऱ्या जोडप्यांना पोलिस
संरक्षण देता येणार नाही, असा महत्वपूर्ण निर्णय अलाहाबाद
हायकोर्टाने दिला आहे. एका प्रेमीयुगुलाने दाखल केलेल्या पोलिस संरक्षणाच्या
याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा निर्णय दिला. या प्रकरणात याचिकादार
जोडप्याने विवाह केला असून, त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस
संरक्षण मागितले होते. मात्र, हायकोर्टाने स्पष्टपणे
सांगितले की, अशा प्रकारच्या विवाहांना समाजात स्वीकारले
जाण्यासाठी वेळ लागतो, आणि त्याला समाजासमोर उत्तरदायी
राहावे लागते. त्यामुळे अशा विवाहांना न्यायालयीन स्तरावरून पोलिस संरक्षण मिळणार
नाही, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. या निर्णयामुळे
पालकांच्या संमतीशिवाय लग्न करणाऱ्या अनेक जोडप्यांसमोर नवा कायदेशीर पेच उभा
राहण्याची शक्यता आहे.