मुहम्मद युनूस राजीनाम्याच्या तयारीत – बांगलादेशमध्ये राजकीय संकट तीव्र

बांगलादेश सध्या एका तीव्र राजकीय संकटाच्या भोवऱ्यात अडकले असून, अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी पदत्याग करण्याचे संकेत दिले आहेत. ढाकामध्ये झालेल्या सल्लागार परिषदेच्या बैठकीत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, "सध्याच्या अस्थिर आणि असहकार वातावरणात काम करणे अशक्य होत चालले आहे. ही केवळ वैयक्तिक अडचण नाही, तर संपूर्ण राजकीय व्यवस्थेचे अपयश आहे.”  युनूस यांनी स्वतःला ओलिस असल्याची भावना होतेय”, असे सांगत राजकीय व्यवस्थेतील तणाव उघड केला आहे. सत्तेपासून दूर झालेले राजकीय पक्ष, विशेषतः विद्यार्थी संघटना आणि सामान्य नागरिक, मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले आहेत. निवडणुकांची मागणी, तसेच सरकारमधील नेत्यांच्या हकालपट्टीची मागणी जोर धरू लागली आहे. लष्कर-सरकार संघर्ष उफाळला युनूस सरकारने अमेरिकेच्या सहकार्याने म्यानमार सीमेवर मानवतावादी कॉरिडॉर स्थापन करण्याचा गुप्त करार केल्याचे उघड झाल्यानंतर लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान नाराज झाले. त्यांनी डिसेंबरअखेर निवडणुका न झाल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. यामुळे नागरी आणि लष्करी व्यवस्थांमध्ये उघड संघर्ष निर्माण झाला असून, ते देशाच्या स्थिरतेसाठी धोकादायक ठरू शकते. विरोधकांचा दबाव वाढतोय महफूज आसिफ, खलीलूर रहमान यांच्यासारख्या मंत्र्यांना हटवण्याची मागणी करत विरोधी पक्ष आणि विद्यार्थी संघटना मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरल्या आहेत. रस्त्यांवर निषेध, आंदोलनं आणि पोलिसांशी धक्काबुक्कीच्या घटनांनी ढाका तणावाखाली आहे. त्यामुळे युनूस सरकारवरील दबाव वाढला आहे. शेख हसीनाच्या पलायनानंतर युनूस यांच्यावर जबाबदारी पुण:स्थिती लक्षात घेतल्यास, माजी पंतप्रधान शेख हसीना भारतात पळून गेल्यानंतर युनूस यांचे सरकार स्थापन झाले होते. त्यांना स्थिरता राखण्याची तात्पुरती जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, सध्या दिसत असलेली अस्थिरता पाहता, हा प्रयोग अपयशी ठरत असल्याचे स्पष्ट होते आहे.