मेघालय हनीमून मर्डर केस : पत्नीच झाली पतीच्या हत्येची सूत्रधार?

इंदौर / मेघालय : ११ मे २०२५ रोजी विवाहबद्ध झालेल्या सोनम आणि राजा रघुवंशी यांच्या नात्याचा
अंत अवघ्या १२ दिवसांत झाला. मेघालयात हनीमूनसाठी गेलेल्या या नवविवाहित
जोडप्यांपैकी राजा यांचा मृतदेह २ जून रोजी वेई सॉडॉन्ग धबधब्याजवळ खड्ड्यात
सापडला, तर सोनम तब्बल १७ दिवस बेपत्ता होती. सोनम आणि प्रियकराकडून
हत्येचा कट? मेघालय पोलिसांनी ८ जूनच्या रात्री सोनमला गाझीपूर (उत्तर प्रदेश)
येथील काशी ढाब्यावर ताब्यात घेतलं. या प्रकरणात सोनमचा प्रियकर राज कुशवाह, तसेच विशाल चौहान आणि आकाश राजपूत यांनाही अटक करण्यात आली
आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, सोनमने प्रियकरासह
राजा यांची हत्या करण्याचा कट रचल्याचा संशय आहे. एका स्थानिक गाईडने सोनमसह अन्य
तीन संशयितांना हत्येच्या ठिकाणी पाहिल्याचा दावा केला आहे.
सोनमचं दुसरं रूप? सोनम ही सुशिक्षित आणि संयमी
मुलगी असल्याचं तिच्या शेजाऱ्यांनी सांगितलं. ती आपल्या भावाच्या कंपनीत काम करत
होती. राजा यांच्या आईनंही सोनमचं सौम्य वर्तन आणि गोड बोलण्याचं कौतुक केलं होतं.
मात्र, सोनमनेच मेघालयातील हनीमूनची योजना आखली होती,
असा दावा आता कुटुंबीय करत आहेत. दुसरीकडे, सोनमच्या
वडिलांनी तिला फसवण्यात आल्याचा आरोप करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. १७ दिवस
कुठे होती सोनम? सोनम २३ मे ते ८ जून या काळात कुठे होती, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ती गाझीपूरच्या ढाब्यावर भयभीत
अवस्थेत सापडली. मात्र पोलिसांच्या मते, ती आपल्या
साथीदारांच्या अटकेनंतरच समोर आली. आणखी एका संशयित आनंद कुर्मीचा शोधही सुरू आहे. मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांचं कौतुक या प्रकरणात
सात दिवसांत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा
यांनी पोलिसांच्या जलद कारवाईचे कौतुक केले आहे. सध्या प्रकरण देशभरात चर्चेचा
विषय बनला आहे.