अतिवृष्टी आणि पुरग्रस्त शेतकऱ्यांना १३५६ कोटींची मदत; सात जिल्ह्यांतील २१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना दिलासा
मुंबई : सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे
बाधित झालेल्या सातारा, कोल्हापूर, बीड,
धाराशिव, लातूर, परभणी
आणि नांदेड जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देण्यात आला आहे. एकूण २१ लाख
६६ हजार १९८ शेतकऱ्यांच्या १५ लाख १६ हजार ६८१.२१ हेक्टरवरील बाधित पिकांसाठी १३५६
कोटी ३० लाख २२ हजार रुपयांची मदत वितरित करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. मंत्री पाटील म्हणाले की,
“राज्य शासनाने नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या
पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्धार केला आहे. या निधीमुळे शेतकऱ्यांना सध्या
अत्यावश्यक दिलासा मिळेल.”
जिल्हानुसार मदतीचा तपशील:
- सातारा: ११,११३
शेतकरी, ४,२१९.२८ हेक्टर
क्षेत्रासाठी ₹६.२९ कोटी मदत.
- कोल्हापूर: ५,८६०
शेतकरी, १,६९६.३६ हेक्टर
क्षेत्रासाठी ₹३.१८ कोटी मदत.
- बीड: ८,०६,५१३ शेतकरी, ६,४४,९१८.५५ हेक्टर क्षेत्रासाठी ₹५७७.७८ कोटी मदत.
- धाराशिव: ४,०४,६५६ शेतकरी, ३,११,२९१.२३ हेक्टर क्षेत्रासाठी ₹२९२.४९ कोटी मदत.
- लातूर: ४,१५,४९२ शेतकरी, २,०६,६२८.९९ हेक्टर क्षेत्रासाठी ₹२०२.३८ कोटी मदत.
- परभणी: ४,३९,२९७ शेतकरी, २,८५,८५३.७८ हेक्टर क्षेत्रासाठी ₹२४५.६४ कोटी मदत.
- नांदेड: ८३,२६७
शेतकरी, ३२,०७३.०२ हेक्टर
क्षेत्रासाठी ₹२८.५२ कोटी मदत.
मकरंद पाटील यांनी पुढे सांगितले की, नैसर्गिक आपत्तीत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना, पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि घरांची पडझड झालेल्या
नागरिकांना जिल्हास्तरावरूनच थेट मदत दिली जाणार आहे. यामुळे मदत प्रक्रिया अधिक
तातडीची आणि कार्यक्षम होईल. या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा
मिळण्यासोबतच प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन प्रणाली अधिक सक्षम झाल्याचे चित्र
दिसत आहे.