लाडकी बहिण योजना : तब्बल ८०,००० अर्ज बाद – हजारो महिलांना १,५०० रुपयांचा लाभ बंद, सरकारचा कठोर निर्णय

मुंबई | प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी "माझी लाडकी बहीण योजना" अंतर्गत एक मोठा आणि धक्कादायक निर्णय समोर आला आहे. योजनेच्या पहिल्या वर्षपूर्तीनंतर सरकारने अर्जांची तपासणी करत सुमारे 8,००० महिलांचे अर्ज अपात्र ठरवत बाद केले आहेत.

 मुख्य कारणे – अर्ज बाद का झाले?

राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की योजना केवळ पात्र आणि गरजू महिलांसाठीच आहे. त्यासाठी e-KYC आणि कागदपत्र तपासणी अनिवार्य करण्यात आली असून, खालील कारणांमुळे अर्ज बाद करण्यात आले: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असणे नमो शेतकरी महासम्मान निधी किंवा इतर योजनांचा लाभ घेतलेला असणे कुटुंबातील सदस्य आयकर भरणारे अथवा सरकारी नोकरीत असलेले चुकीची किंवा अपूर्ण माहिती/कागदपत्रे

जिल्हानिहाय प्रभाव (Aadhaar KYC पडताळणीअंती बाद झालेले अर्ज):

जिल्हा

एकूण अर्ज

बाद झालेले अर्ज

जालना

5,42,392

57,000

नागपूर

-

30,000

अमरावती

-

21,000

यवतमाळ

-

27,000

नोट: इतर जिल्ह्यांतील आकडे अद्याप प्रक्रियेत आहेत.

योजनेचा आढावा:

  • प्रारंभ: 1 जुलै 2024
  • लाभ: दरमहा ₹1,500
  • लाभार्थी महिलांची संख्या (आतापर्यंत): 2.41 कोटी
  • एकूण निधी: ₹46,000 कोटी

 सरकारचे म्हणणे:

राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार, "योजना टिकवण्यासाठी व गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी कठोर निर्णय आवश्यक होता." अपात्र लाभार्थींना वगळल्यामुळे अधिक पारदर्शक व न्याय्य वितरण शक्य होईल, असेही स्पष्ट करण्यात आले.