जय जवान जय किसान मुलांची सैनिकी शाळा व ज्युनिअर कॉलेज सोलापूर 12 वी विज्ञान शाखेच्या 100% निकालाची परंपरा सलग 14 व्या वर्षीही कायम.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सैनिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. सलग चौदाव्या वर्षी शाळेच्या निकालात सातत्यपूर्ण गुणवत्ता दिसून आली असून, यंदा ७ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत, २१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर १ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे.

सैनिक शाळेतील अव्वल तीन विद्यार्थी पुढीलप्रमाणे:

1.       तेजस शुक्राचार्य ढोरे – 84.83% (प्रथम)

2.      श्रेयश गोरखनाथ बगडे – 81.50% (द्वितीय)

3.      आर्यन मनोहर वळसणे – 80.00% (तृतीय)

शाळेच्या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. सुभाष चव्हाण, प्राचार्य रवींद्र चव्हाण तसेच सैनिक शाळेचे कमांडंट श्री अशोक कुमार यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीसह शिक्षक व पालकांचे मार्गदर्शनही या यशामागे महत्त्वाचे ठरले आहे.