दिल्लीमध्ये सुरू होणार ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन, पंतप्रधान मोदींच्या हस्ते

नवी दिल्ली: सरहद्द, पुणे आयोजित मराठी
अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे ९८ व्या भारतीय
साहित्य अखिल संमेलनाला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र
मोदींच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. डॉ. तारा भवाळकर संमेलनाध्यक्षा
आहेत तर ज्येष्ठ नेते शरद पवार संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. मराठी भाषेला अभिजात
भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे पहिलेच मराठी साहित्य संमेलन आहे आणि राजधानी
दिल्लीत हे संमेलन होत आहे. सरहद, पुणे या संस्थेच्यावतीने संमेलनाचे आयोजन
केले जात आहे. २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज साहित्य
नगरीत म्हणजेच तालकटोरा स्टेडियममध्ये हे साहित्य संमेलन होत आहे. संमेलनाच्या
निमित्ताने ३ दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे. यामध्ये कविता, पुस्तक प्रकाशन, चर्चा, परिसंवाद,
मुलाखती असे अखिल भारतीय
मराठी साहित्य संमेलन, दिल्ली २०२५ एकाहून एक कार्यक्रम होणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत दिल्लीतील
विज्ञान भवनात शुक्रवारी दुपारी ३.३० ला साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार
पडणार आहे. उर्वरित सर्व कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीमध्ये
म्हणजेच तालकटोरा स्टेडियम येथे होणार आहेत. दरम्यान, उद्घाटन सोहळ्यास
पंतप्रधान मोदींसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष
शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल. राज्यातील साहित्यिकही या साहित्य सोहळ्यास
उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी ६.३० वाजता उद्घाटनाचे दुसरे सत्र
संमेलनस्थळी होणार असून याप्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे,
मराठी भाषामंत्री उदय सामंत, सांस्कृतिक
कार्यमंत्री आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असेल. मावळते संमेलनाध्यक्ष डॉ.
रवींद्र शोभणे यांचे पूर्वाध्यक्ष भाषण होईल, तर संमेलनाच्या
अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांचे अध्यक्षीय भाषण होईल.