अजितदादा चुकले तर त्यांना परिणाम भोगावे लागतील

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे वाल्मीक कराड यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. त्यावरून धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना घेरले आहे. ते थेट मुंडेंवर आरोप करत आहेत. विधानसमेत त्यांनी या प्रकरणयचा आवाज उठविला आहे. एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत धस यांनी बीडच्या पालकमंत्रिपटावरून मोठे विधान केले आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक इशाराही दिला आहे

तो किती पळाला तरी तो पकडला जाईल. मी सभागृहात मागणी केली होती की एसआयटी गठीत करावी. पहिल्यांदा पत्र देताना मी एसपीचा उल्लेख केला होता. त्यामुळे फडणवीस यांनी थेट आयजीच्या दर्जाच्या अधिकाऱ्याची अजितदादा चुकले तर त्यांना परिणाम भोगावे लागतील धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळात राहू नये, त्यांना बीडचे पालकमंत्रिपद देऊ नये, ही जनतेची मागणी आहे. हा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पाहिजे. ते त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या पक्षाचं काय ते त्यांनी ठरवावं. बहुतेक लोकांनी शरद पवारसाहेब हे मागे पडले आहेत. त्यामुळे आपल्या पुढचा नेता अजित पवार आहे, या भावनेने लोकांनी अजितदादा यांच्या ४१ जागा निवडून दिल्या आहेत. अजितदादा या प्रकरणात चुकले तर त्यांना बरेचसे परिणाम भोगावे लागतील. नाही रे बाचा हे बरोबर नाही. यांच्याऐवजी जुनेच बरे होते. म्हणून पुन्हा लोक शरद पवार यांच्याकडे वळतील. त्यामुळे त्यांनी त्यांचं ठरवावं. त्यांना सांगणारे आम्ही कोण? आम्ही अदोच तालुक्यांचे आमदार आहोत. आम्ही गरीब माणसं आहोत. जेवढी आमची अक्कल आहे तेवही आम्ही शिकवतो, असा टोलाही पस यांनी लगावला आहे. तो किती पळाला तरी तो पकडला जाईल संतोष देशमुख हत्याकांडाचा पोलीस तपास सुरू आहे. आम्हाला गॅरंटी आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक शब्द वापरला आहे की मी कुणालाही सोडणार नाही. त्यामुळे तो आका (वाल्मीक कराड) सुटणार नाही.

एसआयटी स्थापन केली आहे. ती जोरामध्ये काम करत आहे. आम्ही व्यक्तिगत महटले तर सरकारी अभियोकाची नेमणूक करणे, एसआयटीची नेमणूक करण्याची मागणी केली. कुटुंचाला दहा लाखांची मदत जाहीर केली, यामध्ये आम्ही समाधानी आहे. आका पकडल्यानंतर आकाच्या आकाचा काय संबंध आहे का? हेही समोर येईल, असे धस यांनी म्हटले आहे. मुरेश पस म्हणाले: छोटे आका आणि मोठे आका कोण आहेत. हे मी आता सांगू शकत नाही. आकाच्या सर्व गाड्या, इतर विष्णू चाटेच्या नावावर आहेत. हा विष्णू चाटेच खाली आदेश देत होता. आका आणि बाका कुणालाच मी घाबरत नाही. आकापर्यंत मी पोहचलो आहे. आका म्हणजे कोण हे सगळ्यांनाच माहीत आहे. परंतु मी ते सांगत नाही. आकाच्यावरती कोण आहे. जर मोठ्या आकाचे नाव आले तर मी घेईल. ही प्रथा आणि परंपरा आहे. हे फक परळीपर्यंत घडत होते.

आता कार्यक्षेत्र वाढविले आहे. इतर गुंडगिरीचे, खंडणीचे, टक्केवारीचे कार्यक्षेत्र संपूर्ण बीड जिल्हात राबविले जात आहे. अडीच वर्षांपूर्वी सत्ता मिळविल्यानंतर मंत्रिमहोदय यांनी आपले मंत्रिपद, पालकमंत्रिपद माड्याने दिले होते. लीज अॅग्रीमेंट झाल्यानंतर त्यांनी खाली बघितलेच नाही. काम कसे चालले आहे. त्यामुळे हा प्रकार घडत गेला आहे, असा आरोप धस यांनी धनंजय मुंडेवर केला.