हिराचंद नेमचंद महाविद्यालयाचा १२ वी वाणिज्य निकाल ९९.३५% – नेत्रदीपक यश!

सोलापूर (५ मे): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च-एप्रिल २०२५ मध्ये पार पडलेल्या बारावी (वाणिज्य शाखा) परीक्षेत हिराचंद नेमचंद महाविद्यालयाने ९९.३५% इतक्या उत्तम निकालासह शहरात आघाडी घेतली आहे. अकाउंटन्सी विषयात ६ विद्यार्थ्यांनी  १०० पैकी १०० गुण प्राप्त केले.  विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाने आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे महाविद्यालयाने यशाची परंपरा यंदाही भक्कमपणे पुढे चालवली आहे.

 

गुणानुक्रमानुसार यशस्वी विद्यार्थी:

प्रथम क्रमांक: पूर्वा निमानी  – ९५.६७%

द्वितीय क्रमांक: ईशा सोमानी  व विराज राठी  – ९५.१७%

तृतीय क्रमांक: अक्षता शिरढोणे  – ९४.३%

याशिवाय धवल भुतडा  (९४.६७%) आणि राघव करवा  (९४.३३%) यांनीही उल्लेखनीय यश मिळवले.

विषयवार विशेष कामगिरी:

अकाउंटन्सी विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केलेले विद्यार्थी -  ईशा सोमानी , धवल भुतडा, विराज राठी, सई कुलकर्णी, यश कंधारी, पूर्वा निमानी.

गणित विषयात:  ईशा सोमानी – १०० पैकी ९९ गुण, माहिती तंत्रज्ञान विषयात: उदयसिंग घुले  – १०० पैकी १०० गुण प्राप्त केले.

या उल्लेखनीय यशानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सत्यजित शहा म्हणाले, "शिस्तबद्ध अभ्यास, नियमित चाचण्या, मार्गदर्शन सत्रे आणि विद्यार्थ्यांशी सातत्यपूर्ण संवाद या बाबींमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता आला. हे यश म्हणजे आमच्या समर्पित शिक्षकवृंद आणि मेहनती विद्यार्थ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचे फळ आहे."

वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी आणि समस्त विश्वस्त, प्राचार्य, सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.