पुढील ५ दिवस दमदार पावसाचा इशारा – शेतकऱ्यांनी पेरणीसाठी सावध राहावे

पुणे | महाराष्ट्रात यंदा मान्सूनने २५ मे रोजी लवकर प्रवेश केला असून, मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील बहुतांश भागांत १०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. सामान्यतः मान्सून १ जूनला केरळमध्ये दाखल होत असतो आणि ७ ते १० जून दरम्यान महाराष्ट्रात पोहोचतो. मात्र यंदा मान्सूनचे आगमन नेहमीपेक्षा लवकर झाले आहे. पावसाचा जोर कायम; हवामान खात्याचा अंदाज पुढील ४ ते ५ दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे पावसाच्या वापसा येण्यास किमान ७ ते ८ दिवस लागणार असल्याने, शेतकऱ्यांनी सध्या पेरणीची घाई टाळावी, असा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने शेतकऱ्यांसाठी पुढील सूचना दिल्या आहेत: शेतामध्ये पावसाचे पाणी साठू नये, यासाठी योग्य निचरा करा वापसा आल्यानंतर कुळवाने मशागत करून उगमातील ताण कमी करा दर्जेदार व प्रमाणित बियाण्यांची निवड करून नियोजन करा जमिनीतील तापमान कमी होईपर्यंत कपाशी किंवा फळपिकांची लागवड टाळा जमिनीच्या प्रकारानुसार पेरणी सूचना वापसा आल्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे खालीलप्रमाणे पेरणी केली जाऊ शकते: हलकी जमीन: मटकी मध्यम व भारी जमीन: मूग, चवळी, सूर्यफूल, तूर, हुलगा, उडीद परंतु, हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की, जमिनीचे तापमान अद्यापही पुरेसे कमी झालेले नाही, त्यामुळे उगमावर कीड व रोगाचा धोका संभवतो. जनावरांसाठीही सतर्कता आवश्यक जनावरांना दूषित अथवा गाळयुक्त पाणी देऊ नयेजंतनाशक उपचार करून घ्यावेत बुळकांडी रोगासाठी सल्फा गोळ्यांचा वापर करावा जनावरे मजबूत इमारतीत किंवा शेडमध्ये ठेवावीत वीज गडगडाट व पावसाच्या वेळी शेतातील कामकाज थांबवावे व जनावरांना सुरक्षित जागी हलवावे पाणी संकलनाचे महत्त्व पावसाचे पाणी घराच्या छतावरून पाइपद्वारे टाकीत जमा करावे. यामुळे भविष्यातील पाण्याची टंचाई टाळता येईल.