पहिल्यांदा आम्ही हिंदुस्थानी मग काश्मिरी" ; पहलगाम हल्ल्यानंतर स्थानिकांकडून कँडल मार्च

श्रीनगर: पहलगाममध्ये दहशहतवाद्यानी पर्यटकांवर भ्याड हल्ला करत
निष्पाप २७ जणांचा बळी घेतला. या हल्ल्यात
अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित
बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैयबा (एलईटी) च्या संलग्न द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने
या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान, या हल्ल्यात
दहशतवादी प्रत्येक पर्यटकाला धर्म विचारून गोळ्या घालत होते. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये 26 पेक्षा
जास्त पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. ऐन सुट्ट्यांच्या हंगामामध्ये अशाप्रकारे
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. त्यातच स्थानिकांनीही सरकारला हल्लेखोरांना
कठोर शासन करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठीच इथले अनेक स्थानिक, दुकानदार रस्त्यावर उतरले. त्यांनी या या हल्ल्याच्या निषेधार्थ कॅन्डल
मार्च काढला. दरम्यान, स्थानिकांनी कँडल मार्च काढून या
हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. “ज्या अतिरेक्यांनी हा भ्याड हल्ला केला, त्यांचा आम्ही निषेध करतो. आम्ही आधी हिंदुस्तानी आहोत, त्यानंतर आम्ही काश्मीरी”, अशी भावना कँडल
मार्चमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी व्यक्त केली. दुसरीकडे, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या
गणवेशात असलेल्या दोन ते तीन दहशतवाद्यांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांना या भागात
पोहोचण्यास मदत केली. तसेच, कोणालाही संशय येऊ नये म्हणून,
तेच लोक स्थानिक भाषेत बोलत पुढे जात होते आणि पाकिस्तानी दहशतवादी
त्यांच्यासोबत घटना घडवलेल्या ठिकाणी पोहोचले. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार,
बहुतेक हत्यांमध्ये पाकिस्तानी वंशाचे दहशतवादी सहभागी असल्याचे
वृत्त आहे.