भारताच्या हल्ल्याचा परिणाम... पाकिस्तान थेट लष्कराच्या मुख्यालयाचे ठिकाणच बदलणार?

नवी दिल्ली : पहलगाम येथे भारतीय
जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत
पाकिस्तान व पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील (पीओके) दहशतवादी तळांवर अचूक हवाई
हल्ले केले. भारतीय हवाई दलाने नूर खान एअरबेसवर लक्ष्यभेदी हल्ला केला. या
कारवाईत दहशतवादी गटांचे मोठे नुकसान झाल्याने पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे. या
हल्ल्यांनंतर पाकिस्तानच्या लष्करी व्यवस्थेत मोठे बदल होण्याची शक्यता निर्माण
झाली आहे. अहवालानुसार, पाकिस्तान लष्कराचे मुख्यालय (GHQ)
सध्या रावळपिंडीतील चकलाला परिसरात स्थित आहे. परंतु हवाई
हल्ल्यांच्या भीतीने हे मुख्यालय इस्लामाबादमध्ये हलवण्याचा गंभीर विचार सुरू आहे.
भारताच्या ऑपरेशनमुळे पाकिस्तान सरकार आणि लष्कर सतर्क झाले असून, सुरक्षेच्या दृष्टीने मुख्यालयाचे स्थानांतरण हा पुढील पाऊल ठरू शकतो,
असे संरक्षण विश्लेषकांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे भारत-पाकिस्तान
संबंधांमध्ये तणाव आणखी वाढण्याची शक्यता असून, ‘ऑपरेशन
सिंदूर’मुळे भारताने दहशतवादविरोधी लढ्यात स्पष्ट संदेश दिला आहे की, देशाच्या सुरक्षेवर कुठल्याही प्रकारचा हल्ला सहन केला जाणार नाही.