सर्वसामान्य जनतेचा मनस्ताप; पुलाच्या रखडलेल्या कामावरून नाराजी

पौड (ता. मुळशी) – पौड-कोळवण रस्त्यावरील चाले गावाजवळ सुरू असलेल्या पुलाच्या
कामामुळे प्रवासी नागरिकांना मोठ्या अडचणींना
सामोरे जावे लागत आहे. मुसळधार पावसामुळे पाणी रस्त्यावरून
वाहू लागले असून, रस्ता खचण्याची शक्यता व्यक्त
करण्यात आली आहे. प्रशासनाकडून २६ मे रोजी रात्री १० वाजल्यापासून पुढील सकाळपर्यंत या
रस्त्यावर वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. मात्र, पुलाचे काम अपूर्ण असल्यामुळे भराव टाकून तात्पुरता रस्ता तयार करण्यात आला होता, जो सध्या कोळवण खोऱ्यातील नागरिक वापरत आहेत. पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे हा तात्पुरता रस्ता धोकादायक
बनत चालला आहे. रस्ता वाहून जाऊ शकतो किंवा
खचण्याची शक्यता असल्याने, नागरिकांनी या मार्गाचा वापर टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पर्यायी मार्ग सुचवले प्रशासनाने नागरिकांना पौड - दारवली – घोटावडे – मुगावडे – चाले – कोळवण आणि कोळवण – चाले – मुगावडे – घोटावडे –
दारवली – पौड या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. पावसाचे प्रमाण कमी होईपर्यंत हा रस्ता बंद ठेवण्यात येणार
आहे. काम रखडल्याचा फटका सर्वसामान्यांना चाले पुलाचे काम वेळेत पूर्ण झाले नसल्यामुळे नागरिकांना
मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासन व ठेकेदार यांची जबाबदारी
असल्याचा आरोप लोकप्रतिनिधी करत आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे.