उंबरमाळीतील कार अपघाताने खळबळ; झाडीत सापडले तिघांचे कुजलेले मृतदेह!

मुंबई/शहापूर: शहापूर तालुक्यातील उंबरमाळी परिसरात एक थरकाप उडवणारी
घटना समोर आली आहे. नाल्यात पडलेल्या एका कारमध्ये तीन कुजलेल्या मृतदेहांची उलगडलेली
कहाणी संपूर्ण गावकऱ्यांना आणि पोलिसांना हादरवून गेली आहे. ही कार झाडाझुडपांनी
व्यापलेल्या दुर्गम भागात होती, त्यामुळे अपघात
घडून जवळपास पाच-सहा दिवस उलटून गेले तरी कोणालाही याची कल्पना नव्हती. स्थानिक
महिलेमुळे अपघाताचा उलगडा उंबरमाळी गावातील एक महिला गुरं चारण्यासाठी गेलेली
असताना झाडीत एक कार दिसून आली. संशय आल्यावर ती जवळ गेली
असता तीव्र दुर्गंध जाणवला. तिने आत डोकावून पाहिलं असता तीन
मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. तिने तात्काळ गावकऱ्यांना आणि कसारा पोलिस
ठाण्यात माहिती दिली. पोलिसांची कारवाई आणि सुरुवातीचा तपास कसारा पोलिसांनी
घटनास्थळी क्रेनच्या सहाय्याने कार बाहेर काढली. प्राथमिक
तपासात ही कार अंधेरी-खार परिसरातील असल्याचे समोर आले. मृतांपैकी एकाची ओळख यज्ञेश
वाघेला (मुंबई) अशी पटली असून इतर दोघांची ओळख अद्याप स्पष्ट
झालेली नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
घातपाताचा संशय?
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला
असून अपघाताचा अचूक कालावधी आणि कारण शोधले जात आहेत. ही घटना घातपात की अपघात, याची सखोल चौकशी सुरू आहे. कार इतक्या
दिवसांपर्यंत झाडीत दडलेली होती, हेही तपासातील एक
महत्त्वाचं अंग आहे.