बीसीसीआयचा मोठा निर्णय : भारत आशिया चषक 2025 मध्ये खेळणार नाही

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ने 2025 मध्ये होणाऱ्या पुरुष आशिया चषकातून माघार घेतल्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत बीसीसीआयने आशियाई क्रिकेट परिषदेला (ACC) तोंडी माहिती दिली आहे. ही स्पर्धा जून 2025 मध्ये श्रीलंकेत खेळवण्यात येणार होती. ‘द इंडियन एक्सप्रेस’च्या अहवालानुसार, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत जोरदार प्रत्युत्तर दिले. यामुळे निर्माण झालेल्या भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने स्पर्धेतून माघार घेतल्याचे समजते. सध्या ACC चे अध्यक्ष पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी आहेत. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, “ACC चे नेतृत्व पाकिस्तानकडे असल्याने आणि स्पर्धेचे आयोजन त्यांच्या माध्यमातून होत असल्याने आम्ही या स्पर्धेत सहभागी होणार नाही. आम्ही आधीच महिला इमर्जिंग टीम्स आशिया कपमधूनही माघार घेतली आहे. याबाबत आम्ही भारत सरकारच्या संपर्कात आहोत आणि भविष्यात ACC च्या कोणत्याही स्पर्धेत सहभागी होणार नाही.” स्पर्धा रद्द होण्याची शक्यता Asia Cup 2025 ही स्पर्धा टी20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार होती, कारण याच वर्षी टी20 विश्वचषक होणार आहे. 2023 मध्ये भारताने श्रीलंकेचा पराभव करत आशिया चषक जिंकला होता. मात्र, BCCI च्या माघारीमुळे स्पर्धा रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण, बहुतांश प्रायोजक भारतातील आहेत आणि BCCI न खेळल्यास स्पर्धेचे महत्त्व घटतेमागील पार्श्वभूमी 2024 मध्ये आशिया कप पाकिस्तानने आयोजित केला होता. मात्र, BCCI ने भारताचा संघ पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिल्यामुळे ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलमध्ये खेळवण्यात आली होती. भारताचे सर्व सामने श्रीलंकेत झाले होते. त्याच धर्तीवर ICC चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यांमध्येही हायब्रीड मॉडेल वापरले गेले होते.