बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन सातव्या दिवशी, सरकार अजूनही शांत!

अमरावती :-  प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख आणि माजी मंत्री बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन सातव्या दिवशी प्रवेशलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आजही त्यांना फोन करून कर्जमाफीचं आश्वासन दिलं, मात्र अद्याप त्यावर ठोस निर्णय झालेला नाही, अशी प्रतिक्रिया कडूंनी दिली. मुख्यमंत्री म्हणाले, ‘कर्जमाफी नक्की करू, थोडा वेळ घ्या. लवकरच उच्चस्तरीय समिती गठित केली जाईल.’ पण समिती केव्हा बनणार आणि कर्जमाफी केव्हा होणार हे अजून स्पष्ट नाही,” असं बच्चू कडूंनी सांगितलं. त्यांनी प्रहार कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं असून, “आज दुपारी 2 वाजता आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल,” असंही जाहीर केलं.

बावनकुळे यांनी दिलं आश्वासन:

काल (दि.13) राज्याचे मंत्री व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपोषणस्थळी भेट देत बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली. त्यांनी म्हटलं की: कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती गठित केली जाईल. शेतकऱ्यांच्या कर्जाची वर्गवारी करून अहवाल शासनास दिला जाईल. दिव्यांग मानधन वाढीबाबत मुख्यमंत्री सकारात्मक, आणि पावसाळी अधिवेशनात निर्णय घेतला जाईल.

बच्चू कडू यांचे आंदोलन – मागण्या:

  • शेतकऱ्यांची सर्वसमावेशक कर्जमाफी
  • दिव्यांग आणि विधवा महिलांच्या सन्मानपूर्वक मानधनात वाढ
  • मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अन्नत्याग आंदोलन