अक्कलकोटमध्ये जमीन बळकावण्याचा प्रयत्न? – पटेल कुटुंबीयांचा आरोप

सोलापूर :- अक्कलकोट तालुका१९४६
पासून चपळगाव येथील वडिलोपार्जित जमिनीवर कायदेशीर कब्जा व वहिवाट असलेल्या पटेल
कुटुंबीयांच्या मालमत्तेवर बनावट कागदपत्रांच्या आधारे बळकावण्याचा प्रयत्न सुरू
असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, या
प्रक्रियेत अक्कलकोट तालुक्याचे भूमी अभिलेख अधीक्षक आणि उपअधीक्षक यांचा सहभाग
असून, संबंधित उद्योगपतीशी संगनमत करून ही कारवाई केली जात
आहे, असा गंभीर आरोप अल्पभूधारक पटेल कुटुंबीयांनी केला आहे.
या संदर्भात चपळगाव येथील पटेल कुटुंबीयांकडे सर्व कायदेशीर कागदपत्रे, सातबारा, नोंदवही आणि वारसा दाखले आहेत, असे स्पष्ट करण्यात आले. मात्र, स्थानिक माजी
सरपंचाने बनावट खरेदी दाखवून त्या जमिनीवर हक्क सांगण्याचा प्रयत्न केला. उच्च न्यायालयाचा निकाल, तरीही अधिकारी कार्यरत हा
वाद उच्च न्यायालयात गेला असता, न्यायालयाने माजी सरपंचांचा
दावा फेटाळून लावत पटेल कुटुंबीयांच्या बाजूने निकाल दिला. तरीही
भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी न्यायालयाचा अवमान करत असल्याचे आरोपात म्हटले आहे. कोणतीही
हरकत न जुमानता, उपअधीक्षक कार्यालयातून तातडीने प्रक्रिया
राबवली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन; कारवाईची मागणी या पार्श्वभूमीवर आताऊल्ला
पटेल, सलीम पटेल, अजीम पटेल, शाकीर पटेल आदींसह संपूर्ण कुटुंबीयांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे
निवेदन सादर करून संबंधित भूमी अभिलेख अधीक्षक, उपअधीक्षक
आणि उद्योगपतीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.