शोपियानमध्ये लष्कराचे मोठे यश : दोन दहशतवाद्यांचा आत्मसमर्पण

श्रीनगर – पाकिस्तान आपल्या नापाक कारवाया काही केल्या थांबवत नाही, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये
घुसखोरीचा आणखी एक कट भारतीय सुरक्षादलांनी उधळून लावत दोन दहशतवाद्यांना
आत्मसमर्पण करायला भाग पाडले. ही घटना शोपियान जिल्ह्यातील बास्कुचन भागात घडली. लष्कर-ए-तैयबा (LeT) शी संबंधित असलेल्या दोन हायब्रिड दहशतवाद्यांना शोपियानच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (SOG), भारतीय लष्कराची 44 RR आणि CRPFच्या 178 बटालियन यांच्या संयुक्त कारवाईत पकडण्यात
आले. विशेष माहितीवर आधारित ही घेराबंदी आणि शोध मोहीम (CASO) राबवण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये दोन AK-56 रायफल, चार मॅगझिन, 102 जिवंत राउंड्स (7.62×39 मिमी), दोन हँडग्रेनेड, दोन पाउच, ₹5,400
रोख रक्कम, एक मोबाईल फोन, एक स्मार्टवॉच, दोन बिस्किट पॅकेट आणि एक आधार
कार्ड यांचा समावेश आहे. ऑपरेशन सिंदूरचा प्रत्युत्तर अलिकडेच पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६
निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर
भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेतले. या मोहिमेअंतर्गत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी
अड्ड्यांवर लक्ष्य करून १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. पाकिस्तानने त्यानंतर भारतातील अनेक
शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय सैन्याच्या चोख प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानला
युद्धबंदी मान्य करावी लागली. या कारवाईनंतर पाकिस्तानने तुर्कीसह
इतर देशांकडे मदतीसाठी हात टेकला. कठुआ व किश्तवाडमध्ये शोध मोहीम संशयित दहशतवादी हालचालींची माहिती मिळताच कठुआ जिल्ह्यातील लोवांग व सार्थल, तसेच किश्तवाड परिसरात लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने शोध
मोहीम राबवली. यामध्ये दहशतवादी
उपस्थितीचे महत्त्वाचे सुत्र सापडल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.