निर्णायक लढाईची महत्त्वाची बैठक !

आज अंतरवाली सराटी येथे गरीब आणि गरजवंत मराठ्यांचा प्रामाणिक संघर्ष योद्धा श्री. मनोज जरांगे पाटील यांचे नेतृत्वाखाली आगामी २९ ऑगस्ट रोजीच्या "चलो मुंबई..." दौऱ्याच्या निमित्ताने नियोजनाची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदरच्या बैठकीमध्ये जवळपास दीड तास अनेक महत्त्वाच्या विषयांवर मनोज जरांगे पाटील यांनी संवाद साधला. "संघर्ष निम्म्या रस्त्यात सोडता येणार नाही. तसेच लगेच संघर्षाला कंटाळून चालणार नाही. शिवाजी महाराजांनी फक्त एकच लढाई केली नव्हती. हे स्वराज्य अनेक लढाई व संघर्षातून निर्माण झाले आहे. त्यामुळे आपल्यालाही तो आदर्श समोर ठेवून संघर्ष करावा लागेल. आपल्या समाजामध्ये फूट पाडणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पुढच्या अनेक पिढ्यांच्या कल्याणासाठी आपल्याला सलग संघर्ष करावा लागेल." अशा प्रकारचे मत श्री. मनोज जरांगे पाटील त्यांनी सडेतोडपणे मांडले. २९ जून २०२५ रोजी राज्यव्यापी बैठक घेण्याचा निर्णय या मीटिंगमध्ये घेण्यात आला. त्या महत्त्वाच्या बैठकीला माऊली पवार, डॉ. प्रमोद पाटील, ॲड श्रीरंग लाळे, पंडित ढवन, सोमनाथ पवार, श्रीधर पाटील हे उपस्थित होते.