अभिनेता सैफअली खानवर हल्ला रात्री चोरट्याने केले सहा वार

मुंबई: बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर बुधवारी मध्यरात्री जीवघेणा हल्ला झाला. चोरट्याने सैफवर धारदार शस्त्राने 6 वार केल्याचे वृत्त आहे. गंभीर जखमी झालेल्या सैफला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर घरात जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात सैफच्या मानेवर 10 सेमीची जखम झाली आहे. सैफच्या पाठीत शस्त्र खुपसलं गेलं आहे. इतकंच नाही तर सैफच्या तावडीतून सुटका करण्यासाठी त्याच्या हातावर 10 वार वारमुळे आरोपी चोरटा हा पळ काढण्यात यशस्वी ठरला. सैफ अली खानच्या वांद्रयातील घरात पहाटे 2 वाजता ही संपूर्ण घटना घडली आहे. मास्क लावलेला चोरटा पहाटेच्या सुमारास सैफ अली खानच्या घरात घुसला होता. यावेळी घरात चोरी करत असताना सैफला जाग आली होती. दरम्यान, सैफवरील हल्याचे वृत्त समजताच खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेत्यांनी चौकशी करून त्याच्या कुटुंबियांना धीर दिल्याचे वृत्त आहे. सैफवर 6 वार झाले असून त्यापैकी मानेवरील आणि पाठीवरील वार गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.मागून वार, सैफची चोराशी झटापटबॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर एका अज्ञात व्यक्तीने चाकू हल्ला केला आहे. घरात शिरुन या अज्ञात व्यक्तीकडून सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला. सध्या सैफवर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याच्यावर एक शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे.या हल्ल्यात सैफच्या मानेला १० सेंटीमीटरती जखम झाली आहे. तर त्याच्या पाठीवर आणि हातावरही मोठा वार करण्यात आला आहे. सैफ अली खानच्या पाठीवर धारदार शस्त्र खुपसल्याचं समोर आलं आहे. ते शस्त्र शस्त्रक्रिया करुन बाहेर काढण्यात आल्याचीही माहिती आहे. लीलावती रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.सैफने पोलिसांना काय सांगितलंसकाळी सैफ अली खानने मुंबई पोलिसांना एक स्टेटमेंट दिलं आहे. त्यामध्ये सैफने सांगितलं की, मी घरी बसलो होतो, तेव्हा माझ्यावर कोणीतरी मागून हल्ला केला. त्या हल्ल्यात दुखापत झाली. मी त्याच्याशी लढण्याचा प्रयत्न केला. यावेळी घरी मुलं आणि करिनाही होती. त्यांना वाचवण्यासाठी त्या व्यक्तीला प्रतिकार करावा लागला. ओव्हरपावर करण्याचा प्रयत्न केला पण मला दुखापत झाली होती, त्यात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे मी त्याला पकडू शकलो नाही. सैफ अली खानच्या टीमकडून निवेदन जारी करण्यात आलं आहे. एक चोर रात्री घरी आला, त्याच्या हल्ल्यात सैफ अली खान जखमी झाला. सध्या त्याच्यावर उपचार सुरु असून चाहत्यांनी संयम बाळगावं असं आवाहन त्याच्या टीमकडून करण्यात आलं आहे. पोलिसांचा तपास सुरुवांद्रे पोलिसांकडून अधिकचा तपास सुरु आहे. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी कुटुंबीयांचीही चौकशी केली जात आहे. त्यावेळी नेमकं काय घडलं याची माहिती सध्या पोलीस घेत आहेत. ही अज्ञात व्यक्ती चोरीच्या उद्देशाने शिरली होती, हल्ला करण्याच्या उद्देशाने घरात आली होती की काही पूर्व वैमनस्यातून ही घटना घडली याचाही तपास पोलीस करत आहे. यापूर्वी या व्यक्तीने घराची रेकी केली होती याचाही तपास केला जात आहे. तसेच, पोलिसांनी याप्रकरणी ही घटना घडली तेव्हा घरात असेलेल्या तीन कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतली आहे. शरद पवारांनी सैफच्या हल्ला प्रकरणावरून साधला फडणवीसांवर निशाणा बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून एका हल्लेखोराने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. त्याच्यावर ६  गंभीर वार करण्यात आले असून त्यातील एक घाव खोलवर असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत सर्व स्तरातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी देखील या घटनेवर मत मांडले आहे.  शरद पवार यांनी मत मांडत असताना  राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत असल्याचे म्हटले आहे.मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज

आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी महायुती सरकारवर या घटनेचे खापर फोडले. याविषयी बोलताना त्यांनी,”मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती किती वाईट झाली आहे असे त्यांनी म्हटले आहे? या भागात एका व्यक्तीची हत्या झाली आणि आता दुसऱ्यावर हल्ला झाला आहे, ही चिंताजनक बाब आहे. मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे कारण जनता आता त्यांच्यासोबत आहे” असे म्हणत त्यांनी फडणवीसांना टोला लगावला. तर दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या हल्ल्यावर संशय व्यक्त केला असून हा हल्ला पूर्वनियोजित कट होता का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.तर या घटनेवर शिवसेनेचे यूबीटी खासदार संजय राऊत यांनीही सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिकट झाल्याचे म्हटले आहे. राज्यात जनता सुरक्षित नाही. तसेच सैफवरील हल्ला हा मोदींसाठी धक्का असल्याचे म्हटले. कारण पदमश्री किताबाने सन्मानित करण्यात आलेल्या व्यक्तीवर हल्ला होणे हे सरकारचे अपयश असल्याचे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.दरम्यान, या घटनेवर मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही घटना १५ आणि १६ जानेवारीच्या मध्यरात्री सैफच्या वांद्रे येथील निवासस्थानी घडली. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सैफची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.