सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी ₹५०० मुद्रांक शुल्क माफ

मुंबई : राज्यातील लाखो विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. शासकीय कार्यालयांमध्ये दाखल कराव्या लागणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी आवश्यक असलेले ५०० चे मुद्रांक शुल्क तातडीने माफ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोणत्या प्रमाणपत्रांसाठी शुल्क माफ?

जात पडताळणी प्रमाणपत्र
उत्पन्नाचा दाखला
रहिवासी प्रमाणपत्र
नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र
राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
इतर शासकीय कामांसाठीचे प्रतिज्ञापत्र

विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना फायदा

🔹 यापुढे एका साध्या कागदावर सेल्फ-अटेस्टेड अर्ज लिहून तहसील कार्यालयातून प्रमाणपत्र मिळू शकते.
🔹 दहावी आणि बारावी परीक्षेनंतर आवश्यक कागदपत्रांसाठी होणारा ३ ते ४ हजार रुपयांचा खर्च वाचणार आहे.
🔹 यापूर्वी १०० रुपयांवरून ५०० रुपयांपर्यंत वाढवलेले शुल्क विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकांना आर्थिक फटका देत होते. मात्र, या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.