ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणमधून ११० भारतीय विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका

नवी दिल्ली :- इस्रायल आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असताना, भारत सरकारने इराणमधील हजारो भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ‘ऑपरेशन सिंधू’ सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत ११० विद्यार्थ्यांची पहिली तुकडी गुरुवारी सकाळी दिल्लीत दाखल झाली. विद्यार्थ्यांना उत्तर इराणमधून आर्मेनियाला, त्यानंतर कतारमार्गे भारतात आणण्यात आले. परराष्ट्र राज्यमंत्री के. व्ही. सिंग यांनी विमानतळावर विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया:

विद्यार्थ्यांनी सरकारच्या या योजनेचे आभार मानले. यासिर गफ्फार या विद्यार्थ्याने ANI शी बोलताना सांगितले, “आम्ही रात्री क्षेपणास्त्र उडताना पाहिलं आणि मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले. मात्र, सरकारने अक्षरशः आमच्या दारातूनच आम्हाला सुरक्षित बाहेर काढलं, यासाठी आम्ही आभारी आहोत.”

माहितीच्या ठळक बाबी:

  • ऑपरेशन सिंधू अंतर्गत मदतकार्य सुरू
  • इराणमधील ४,००० हून अधिक भारतीय नागरिकांपैकी अर्धे विद्यार्थी
  • ११० विद्यार्थी सुरक्षितरित्या दिल्लीला परतले
  • पहिल्यांदा इराण आर्मेनिया कतार भारत असा प्रवास
  • २३x७ नियंत्रण कक्ष आणि हेल्पलाइन कार्यान्वित