सोलापूर बाजार समितीत दुसऱ्या दिवशीही गोंधळाची स्थिती
.jpeg)
▶ सोलापूर, दि. २०-
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ.
बाबासाहेव आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सोलापूर कृषी
उत्पन्न बाजार समितीमधील विविध माथाडी कामगार संघटनांनी गुरुवारी काम बंद आंदोलन
केल्याने कांद्याचे लिलाव होऊ शकले नाही. शुक्रवारी लिलाव पार पडले. मात्र, अचानकपणे
लिलाव झालेला कांदा ट्रकमध्ये भरण्यास माथाडी कामगारांनी नकार दिल्याने विक्री
झालेला कांदा तसाच पडून आहे. बाजार समितीत दुसऱ्या दिवशीही गोंधळाची स्थिती
निर्माण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. सोलापूर
बाजार समिती कांदा विक्रीसाठी राज्यात प्रसिध्द असून या ठिकाणी दररोज ४०० ते ५००
ट्रक खरेदी-विक्री होते. विशेष म्हणजे विक्री झालेला कांदा त्याच
बेकायदेशीर संप पुकारल्यास कायदेशीर कारवाई : निंबाळकर
सोलापूर बाजार समिती राज्यात अग्रेसर असून या ठिकाणी
दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. शेतकरी हा बाजार समितीच्या दृष्टीने
केंद्रबिंदू आहे. यापुढे बाजार समिती प्रशासनाला लेखी सूचना न देता संप पुकारल्यास
व्यापारी, माथाडी कामगार व तोलारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा
इशारा बाजार समितीचे प्रशासक मोहन निंबाळकर यांनी दिला आहे. दिवशी ट्रकमध्ये भरून
पाठविला जातो. यातून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. गुरुवारी रात्री
गृहमंत्री शहा यांच्या निषेधार्थ माथाडी कामगार संघटनांनी शेतकऱ्यांनी आणलेला
कांदा उतरवण्यास नकार देऊन काम बंद आंदोलन सुरू केले. अचानकपणे सुरू केलेल्या
आंदोलनामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सकाळी हैदराबाद रस्ता रोखून धरला.
त्यानंतर पोलीस प्रशासन, बाजार समिती प्रशासन व व्यापारी संघटनांनी मिळून शेतकरी व
माथाडी कामगारांना समजावून सांगून तो कांदा उतरवण्यात आला. शुक्रवारी सकाळी
सुरळीतपणे लिलावही पार पडले. मात्र, अचानकपणे माथाडी कामगारांनी विक्री झालेला कांदा भरणार
नसल्याचे सांगितले. त्यामुळे पुन्हा गोंधळाची स्थिती निर्माण झालो. या सर्व
पार्श्वभूमीवर बाजार समितीचे प्रशासक मोहन निंबाळकर यांनी उद्या (शनिवारी) सकाळी
नऊ वाजता व्यापारी व माथाडी कामगार संघटनांची बैठक बोलावली आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक
शेतकऱ्यांचे मोठे हाल होत असून याचा दरावरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात
येत आहे. उद्या (शनिवारी) कांदा न उचलल्यामुळे लिलाव होऊ शकणार नाहीत.