सोलापूर जिल्ह्यात महापुरामुळे वीजपुरवठा खंडित

सोलापूर | २४ सप्टेंबर २०२५
भीमा व सीना नदीच्या पुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, मोहोळ, पंढरपूर, उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये नागरिक अडकले असून, वीजपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे.

महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार –

  • ५६ गावे अंधारात
  • ३८०० वाहिन्यांचे नुकसान
  • २४५२ रोहित्रे व ८ उपकेंद्रांना फटका
  • २७,८२५ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित (यात १७,९३० शेतकरी ग्राहकांचा समावेश)

पूरामुळे ट्रान्सफाॅर्मर पाण्यात गेले असून, सुरक्षेच्या कारणास्तव महावितरणने वीजपुरवठा बंद केला आहे.

अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी सांगितले की, पावसामुळे खांब कोसळणे, रोहित्रे जळणे, केबल्स तुटणे आणि ट्रान्सफाॅर्मर बंद पडणे यामुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. पाणी ओसरल्यानंतर दुरुस्तीची मोहीम हाती घेण्यात येईल. कोणत्याही अनुचित घटना घडू नयेत म्हणून सावधगिरी बाळगली जात आहे.”

दरम्यान, महावितरणचे अभियंते गावोगावी भेट देत परिस्थितीचा आढावा घेत आहेत व नागरिकांना वीजयंत्रणेपासून दूर राहण्याचे आवाहन केले जात आहे.

 हायलाइट्स

  • पूरामुळे ५६ गावे अंधारात
  • ३८०० वाहिन्या व २४५२ रोहित्रांचे नुकसान
  • २७,८२५ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
  • महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
  • परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दुरुस्ती मोहीम सुरू