महाराष्ट्रात ८० हजार कोटींची गुंतवणूक; ४० हजार रोजगार निर्माण

मुंबई | 20  सप्टेंबर २०२५
महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणुकीला मोठी चालना मिळाली आहे. आयफा (AIIFA) तर्फे आयोजित स्टील महाकुंभ कार्यक्रमात राज्य सरकारच्या उद्योग विभागाने तब्बल ९ कंपन्यांशी ₹80,962 कोटींचे सामंजस्य करार (MoU) केले. या करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नवकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या झाल्या. 
या गुंतवणुकीमुळे ४० हजारहून अधिक रोजगार निर्मिती होणार असून, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, रायगड, छत्रपती संभाजीनगर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये प्रकल्प उभारले जातील.

 मुख्यमंत्र्यांची घोषणा
फडणवीस म्हणाले,

  • "महाराष्ट्रात २०३० पर्यंत ५८% वीज अक्षय ऊर्जेतून येणार."
  • "२०२६ पर्यंत शेतकऱ्यांना मिळणारी १६,००० मेगावॅट वीज सौरऊर्जेद्वारे पुरवली जाईल."
  • "सबसिडी कमी होऊन उद्योगांसाठी वीजदर पुढील पाच वर्षे दरवर्षी स्वस्त होणार."

 कार्यक्रमाचे उद्घाटन
आयफा स्टीलेक्स २०२५ या स्टील महाकुंभाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग सचिव डॉ. पी. अन्बलगन, यूएनडीपी इंडिया प्रमुख डॉ. अँजेला लुसी, आयफा अध्यक्ष योगेश मंधाणी आणि मानद सरचिटणीस कमल अग्रवाल उपस्थित होते.

 हायलाइट्स

  • ₹80,962 कोटींचे MoU महाराष्ट्रात
  • ९ कंपन्यांशी सामंजस्य करार
  • ४०,००० पेक्षा जास्त रोजगार निर्मिती
  • विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील विकासाला गती
  • उद्योगांसाठी वीजदर कमी होणार